Monday 6 May 2013

जनतेला खऱ्या अर्थाने सुशिक्षित करण्यातूनच देशापुढील /समाजापुढील समस्या नष्ट होण्यास सुरुवात होईल.

जनतेला परिणामकारकरित्या  सुशिक्षित करण्याची सुरुवात प्राथमिक शिक्षणापासूनच होते, असे मला वाटते.

त्यासाठी शासनाने प्राथमिक शिक्षणावर , ते आता जितका खर्च करते, त्याच्या ५० पट अधिक खर्च केला पहिजे.

मुलांना शिक्षण देताना वैज्ञानिक दृष्टिकोन , सामाजिकता , नैतिकता, सृजनशीलता  इत्यादि  बाबी शिकविण्यावर  भर दिला पाहिजे . त्यासाठी अभ्यासक्रमात मूलगामी सुधारणा करणे आवश्यक आहे .

प्राथमिक शिक्षकासाठीची योग्यता आणि त्याला दिले जाणारे वेतन व सुविधा यात अनेकपट वाढ करणे अपेक्षित आहे .

पुढे चालून विद्यार्थी 'प्राथमिक शिक्षक' ही आपल्या करीयरची एक महत्त्वाची संधी मानतील , एवढी प्राथमिक शिक्षकाची योग्यता वाढविण्याची गरज आहे.

"शिक्षण सेवक" या संकल्पनेने प्राथमिक शिक्षणाचा बट्ट्याबोळ करण्यात मोठे योगदान दिलेले आहे , असे मला प्रामाणिकपणे वाटते . 

No comments:

Post a Comment