Thursday 16 May 2013

आपल्या देशात विविध जाती,धर्म, संप्रदाय, कुळ, वर्ण, विचारधारा, परंपरा, इतिहास, आदर्श असलेले लोक राहतात. या विविधतेचा आपल्याला अभिमानही वाटतो. तथापि या विविधतेमुळे आपले कुठल्याच  विषयावर एकमत होत   नाही. प्रत्येक गोष्ट म्हणजे कोणतीही  घटना, इतिहास पुरुष , विचारधारा, परंपरा, विविध  संकल्पना,आपले ध्येय , आपला इतिहास इत्यादी बाबीकडे आपण  वर उल्लेखित चष्म्यातूनच बघत असतो. त्यामुळे आपले वरील  बाबतींमध्ये तीव्र मतभेद असतात. मानव प्राणी बुद्धिमान आहे. मतभेद स्वाभाविक आहेत. परंतु वरील  चश्म्यामुळे आपल्यांमध्ये अगदी साध्या साध्या विषयावरही टोकाचे मतभेद होतात. श्री चाक्रधरांचे एक  वचन आहे. " मनुष्य मात्र होवोनि असावे " थोडक्यात, सर्व चष्मे टाकून देऊन सर्व माणसाचा  फक्त मनुष्य म्हणुन विचार करावा.

या कृत्रिम मतभेदांमुळे आपल्या कुठल्याच चळवळी किंवा आंदोलने सर्वसमावेशक बनत नाहीत किंवा पुढे तसे चालू राहत नाहीत. याला याला एकाच उपाय --- मनुष्य  मात्र होवोनि असावे. ------पण  कसे ?

No comments:

Post a Comment