आज बुद्ध पोर्णिमा अर्थात बुद्ध जयंती साजरी करण्यात येत आहे.
भगवान बुद्ध म्हणजे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व. सामाजिक समता व विचारांची स्वतंत्रता हे त्यांच्या विचारविश्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. जागतिक तत्त्वज्ञानाचा इतिहास भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे जाणकारांना मान्य आहे.
वेदोक्त कर्मकांडाच्या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धांनी पुरस्कृत केलेला विशुद्ध जीवनाचा आग्रह हा आजच्या जीवनातही उपयुक्त ठरतो.
"बुद्ध भारताचा सर्वश्रेष्ठ पुरुष असल्याबद्दल भारतीय व पाश्चात्य विद्वानांमध्ये दुमत नाही." या शब्दांत प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित श्री शरद पाटील भगवान बुद्धांचा यथार्थ गौरव करतात.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांप्रती कोटी कोटी प्रणाम.
भगवान बुद्ध म्हणजे भारताच्या सामाजिक आणि आध्यात्मिक जीवनातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्व. सामाजिक समता व विचारांची स्वतंत्रता हे त्यांच्या विचारविश्वाचे महत्त्वाचे पैलू आहेत. जागतिक तत्त्वज्ञानाचा इतिहास भगवान बुद्धांच्या तत्त्वज्ञानाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, हे जाणकारांना मान्य आहे.
वेदोक्त कर्मकांडाच्या पार्श्वभूमीवर भगवान बुद्धांनी पुरस्कृत केलेला विशुद्ध जीवनाचा आग्रह हा आजच्या जीवनातही उपयुक्त ठरतो.
"बुद्ध भारताचा सर्वश्रेष्ठ पुरुष असल्याबद्दल भारतीय व पाश्चात्य विद्वानांमध्ये दुमत नाही." या शब्दांत प्रसिद्ध प्राच्यविद्यापंडित श्री शरद पाटील भगवान बुद्धांचा यथार्थ गौरव करतात.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त भगवान बुद्धांप्रती कोटी कोटी प्रणाम.
No comments:
Post a Comment