Tuesday 14 May 2013


आज आद्य शंकराचार्य यांची जयन्ति. अद्वैत तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठ प्रणेते . वेदांत तत्त्वज्ञान अतिशय प्रगल्भ आणि तर्कप्रतिष्ठित बनविण्यात शंकराचार्यांचा   वाटा फार मोठा आहे. तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात ९० % हून अधिक लोक अद्वैत तत्त्वज्ञानाचे अनुयायी आहेत, यावरून भारतीय तत्त्वज्ञानावरील त्यांचा प्रभाव स्पष्ट होतो.
"सर्व खलु इदं ब्रह्म"  (सर्व विश्व ब्रह्मस्वरूप आहे); "अहं ब्रह्म अस्मि"(मी ब्रह्म   आहे) ; या सारख्या सुत्राद्वारे  त्यांनी जीव आणि जगत हे ईश्वर स्वरूप मानले. वेदांताची पद्धतशीर मांडणी करण्याचे त्यांचे कार्य त्यांची प्रकांड बुद्धिमत्ता सिद्ध करते.
वयाच्या आठव्या वर्षी गृहत्याग करून त्यांनी संपूर्ण भारत वर्षात आपल्या तत्त्वज्ञानाचा परिणामकारकरित्या        
प्रचार आणि प्रसार केला.
सन ७८८  ते  ८२० या केवळ 3२ वर्षांच्या या  अल्प कालावधीत त्यांनी केलेले कार्य विस्मयकारक आहे, यात शंका नाही.
धर्म प्रचारासाठी त्यांनी भारताच्या चार कोपऱ्यामध्ये  चार मठ स्थापन केले. १. द्वारका २. पुरी ३. बद्रीनाथ ४. रामेश्वर .
अद्वैत तत्त्वज्ञानाच्या रूपाने त्यांनी समतेच्या तत्त्वाला आध्यात्मिक व तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान पुरविले, असे मला वाटते .

No comments:

Post a Comment