आज वेदांतावरील शंकराचार्यानंतरचे समर्थ भाष्यकार रामानुजाचार्य
यांची जयंती. त्यांनी प्रथमच सामन्यांच्या भक्तिला वेदांताचा भाग
बनविले. " विशिष्टाद्वैत " हा त्यांचा वेदांतावरील सिद्धांत. सोप्या
पद्धतीने वेदांत सांगणारे हे आचार्य होते. अकरावे शतक हा त्यांचा
कालावधी. प्रत्येक व्यक्ती ही बरे वाईट कर्म करण्यास स्वतंत्र असून
फळ भोगण्यास मात्र परतंत्र आहे. म्हणजे त्याच्या कर्माचे चांगले वाईट
फळ ईश्वर देतो. थोडक्यात, व्यक्ती चांगले काम करून आपले
चिरकालीन भविष्य उज्ज्वल बनवू शकते , हे त्यांचे मत प्रत्येकास
व्याक्तीविकासाची हमी देते . त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर
अभिवादन.
No comments:
Post a Comment