Tuesday 14 May 2013


डॉ . कमल  गोखले यांनी 'शिवपुत्र संभाजी' या संशोधनात्मक ग्रंथाद्वारे संभाजी राजे यांचा जीवनपट समर्थपणे उलगडून दाखविलेला आहे. राजे संभाजी यांच्याविषयी बरेचशे समज - गैरसमज या पुस्तकामुळे दूर होण्यास मदत झालेली आहे .हा ग्रंथ पूर्णपणे ऐतिहासिक साधनावर आधारित आहे.
 संभाजी राजे अतुलनीय शौर्यवान  होते , यात शंका नाही. पण ते विद्वान होते, हेही सिद्ध झालेले आहे.
त्यांच्या ऐतिहासिक बलिदानामुळे त्यांचे धाडस, सहनशक्ती, स्वाभिमान(धर्माभिमान म्हणजे स्वाभिमानच.) प्रखरपणे समोर आले.
त्यांच्या बलिदानामुळे मराठ्यांच्या मनात जी आग पेटल्या गेली, ती कित्येक वर्षे ज्वलंत राहिली. शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण होण्यात या बलिदानाचे योगदान फार महत्त्वपूर्ण राहिलेले आहे.
त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सादर प्रणाम. 

No comments:

Post a Comment