Thursday 16 July 2015

१1)      दररोजच्या वृत्तपत्रातून अपघाताच्या अनेक बातम्या वाचनात येतात. नादुरुस्त रस्ते, प्रशिक्षित नसलेले चालक व व्यवस्थेत निर्माण झालेली स्पर्धा व तदनुषंगिक घाई, अशी अपघातांची करणे देता येतील.
मला नेहमी वाटते अपघाताचे वृत्त देताना अपघात कसा घडला याचे सविस्तर वृत्त दिले पाहिजे. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत हे अपघात घडतात, हे वाचकाला समजू शकेल. व्याखाने देऊन जनतेचे प्रबोधन करण्यापेक्षा असे प्रबोधन अधिक उपयुक्त ठरेल. कारण प्रत्यक्ष उदाहरणाने वास्तवाची प्रचीती अधिक परिणामकारकतेने येते.

२2)       सातवीपर्यंत इतक्या विषयांच्या ज्ञानाचे व त्यांच्या पुस्तक-वह्यांचे ओझे लादायलाच नको. विषयांची माहिती शिकविण्याऐवजी या विषयांना जीवनाशी जोडणारे ज्ञान शिकविणे महत्त्वाचे आहे. सातवीच्या पुढील शिक्षणात टप्प्या-टप्प्याने विषयांचे ज्ञान दिले तरी चालेल. मुलांमध्ये  सुरुवातीच्या आयुष्यात परस्परांविषयी आदर, परस्परसौहार्द, समता, परमतसहिष्णुता, पर्यावरणप्रेम, काटकसर असे गुण बिंबविणे महत्त्वाचे आहे. आणि तेवढ्यापुरतीच वह्या-पुस्तकांची गरज असावी. मग दप्तरांचे ओझे कमी करण्याचे वेगळे उपाय करण्याची गरज नाही.

No comments:

Post a Comment