Tuesday 28 June 2016

अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केल्याशिवाय NSG मध्ये प्रवेश मिळत नाही, हे जर खरे असेल तर NSG मध्ये  प्रवेश मिळण्यासाठी मिळविल्या जाणाऱ्या आणि अनेक देशांकडून मिळत असलेल्या  पाठीम्ब्याचा काय अर्थ असेल! की हा सर्व प्रकार म्हणजे एका राजकीय नाट्याचा अविष्कार होता? भारताचा NSG मध्ये प्रवेश व्हावा असे खरोखरच या देशांना वाटत असेल तर अण्वस्त्रप्रसारबंदी करारावर स्वाक्षरी करण्याच्या अटीबद्दल या देशांचे काही मत होते असे काही वाचनात आले नाही. की पाठींबा द्यायचे नाटक आपण करायचे, प्रवेश होऊ न देण्याचे काम परस्पर चीन सारखे देश करतीलच यावर या पाठींबा देणाऱ्या देशांचा विश्वास होता?

No comments:

Post a Comment