Tuesday 21 June 2016

परकीय गुंतवणुकीला अनेक क्षेत्रे अधिकाधिक खुली केल्यामुळे काही अनिष्ट परिणाम होऊ शकतील काय, यावर विचार करण्याची गरज वाटते. भांडवल आणि तंत्रज्ञान यांच्या प्रचंड गुंतवणुकीच्या आधारावर परकीय उद्योजक येथील अर्थव्यवस्थेवर नियंत्रण प्रस्थापित करू शकतील काय, या प्रश्नाचे उत्तर सामान्यांना मिळाले पाहिजे. अवाढव्य गुंतवणूक आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापुढे येथील उद्योजक टिकाव धरू शकतील काय, यावरही शंका निर्माण होऊ शकते. मग येथील लोकांनी या परकीय उद्योगांमध्ये फक्त नोकऱ्याच करायच्या काय? त्याही या उद्योगांच्या मर्जीवर.
मर्यादित परकीय गुंतवणुकीसोबतच देशांतर्गत भांडवल वाढीसाठी प्रयत्न करणे अतिशय महत्त्वाचे वाटते. त्या दृष्टीने आपण काय करीत आहोत, यावर अर्थतज्ज्ञांनी प्रकाश पडावा, असे वाटते. 

No comments:

Post a Comment