Thursday 26 November 2015

आमिर खान आणि

अमीर खानच्या वक्तव्याविरुद्ध प्रतिक्रियांचा जो गदारोळ उठला आहे, तो अमीर खानच्या वक्तव्यात काही अंशी तरी तथ्य आहे, हेच अधोरेखित करीत नाही काय? सध्या वाढलेल्या तथाकथित असहिष्णुतेविषयी देशातील अनेक लेखक-कलावंत-विचारवंत-शास्त्रज्ञ यांचे जे मत बनले आहे, ते का बनले आहे याचाही विचार आपण करू नये काय? अमीर खानचे तसे मत बनले असेल तर ते का बनले आहे याचा खोलात जाऊन विचार करण्याची गरज आहे.त्याच्या वक्तव्याच्या मागचे पुढचे संदर्भ लक्षात न घेता आपण प्रतिक्रिया व्यक्त करण्याची किती घाई करतो! तरीही  अमीर खानच्या वाटण्यात काही अंशी तरी तथ्य आहे काय, याचाही विचार करायला हवाच. काही असले तरी अमीर खानची उक्त प्रतिक्रिया ही Over Reaction च्या सदरात येते हे मात्र मान्य करावे लागेल.तेवढ्यापुरता त्याला दोष दिलाच पाहिजे. त्याच्यासारख्या प्रथितयश व्यक्तीने अशी वक्तव्ये करण्यापूर्वी विचार केला पाहिजे.
अमीर खानऐवजी इतर मुस्लीम नसलेल्या व्यक्तींनी जेंव्हा अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या तेंव्हा आपण एवढा गदारोळ केलेला आहे काय?  अमीर खान मुस्लीम नसता तर त्याच्या प्रतिक्रियेवर आपण एवढे क्रुद्ध  झालो असतो काय, याचेही  प्रत्येकाने आत्मपरीक्षण  केले पाहिजे. याचे उत्तर नकारात्मक येत असेल तर ते अतिशय गंभीर आणि संवेदनशील माणसांची काळजी वाढविणारे आहे, यात शंका वाटत नाही.

No comments:

Post a Comment