यापूर्वी घडलेल्या असहिष्णुतानिदर्शक घटनांच्या वेळी लेखक, विचारवंतांनी पुरस्कार परत केले नाहीत म्हणून त्यांनी आता ते परत करू नयेत, असा युक्तीवाद कसा काय
सिद्ध होऊ शकतो. आधी पुरस्कार परत न करण्यात चूक झाली असेल तर आता ते परत करून ही
चूक दुरुस्त करूच नये काय?
दुसरी गोष्ट महणजे यापूर्वी घडलेल्या असहिष्णुतादर्शक घटनांना त्यावेळच्या सरकारचा पाठींबा नव्हता, असे लोकांचे मत असल्याचे दिसते. आता मात्र या घटना सरकारपुरस्कृतच असाव्यात असा संशय लोकांच्या मनात असल्याचे जाणवते. त्यामुळेच यापूर्वी पुरस्कारवापसीचा प्रश्न निर्माण झाला नसावा. आता मात्र सरकारवरील संशयामुळे लेखक-विचारवंतांना पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याची आवश्यकता वाटली असावी.
दुसरी गोष्ट महणजे यापूर्वी घडलेल्या असहिष्णुतादर्शक घटनांना त्यावेळच्या सरकारचा पाठींबा नव्हता, असे लोकांचे मत असल्याचे दिसते. आता मात्र या घटना सरकारपुरस्कृतच असाव्यात असा संशय लोकांच्या मनात असल्याचे जाणवते. त्यामुळेच यापूर्वी पुरस्कारवापसीचा प्रश्न निर्माण झाला नसावा. आता मात्र सरकारवरील संशयामुळे लेखक-विचारवंतांना पुरस्कार परत करून सरकारचा निषेध करण्याची आवश्यकता वाटली असावी.
No comments:
Post a Comment