Tuesday 15 March 2016

कन्हैया।

कन्हैया- किती ही चर्चा! समर्थक आणि विरोधक यांच्यातील युद्धच जणू. तो जे बोलला ते प्रभावी होते, हे विरोधकही मान्य करतील. पण त्यात नवीन काय होते? विशिष्ट विचारधारेच्या(कम्युनिस्ट) चौकटीतीलच विचार होते ते. अनेक वर्षांपासून आपण हे विचार ऐकतो. तरीही या विचारांच्या निमित्ताने कान्हैयाचे अमाप  कौतुक चालले आहे!
विरोधकही किती त्वेषाने टीका करीत आहेत! आता देशासमोर फक्त एकच संकट उभे आहे. ते म्हणजे कन्हैया. मग त्याला देशद्रोही ठरविण्याची न्यायालयीन भूमिका पार पाडायची, त्याच्या भाषणातील तपशिलाच्या चुका शोधायच्या, त्याच्या गरिबीपासून आजादीच्या घोषणेवर ‘गरिबी कोणी आणली’ असे असंबद्ध प्रश्न उपस्थित करायचे, त्याच्या भांडवलशाहीविरोधाला फैलावर घ्यायचे, असे नित्य उपक्रम चालू आहेत. तो मार्क्सवादाची भलामण करतो म्हणून त्याच्यावर टीका करायची, मार्क्सवादाने कोणाचे भले केले, असे म्हणायचे, हिटलरपेक्षा कम्युनिस्ट राजवट अधिक हिंसक हे सुचवायचे, असे हास्यास्पद प्रकारही जोमाने चालू आहेत. अशा टीकेमुळे कान्हैयालाच अधिकाधिक प्रसिद्धी मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या विरोधामागच्या हेतुचाच पराभव होतो.

देशप्रेमाचे भडक नाटक दाखविणे, देशप्रेमाचे कर्मकांड करणे यातच तथाकथित देशभक्तांची देशभक्ती सामावलेली असल्याचे दिसून येत आहे. अरे! देश म्हणजे देशातील माणसेच ना! त्यांच्या अवनत स्थितीकडे बघा. त्यांचे हित साधण्यात स्पर्धा करा. खरा देश व देशप्रेम तिथेच आहे. बाकी सगळा तमाशा!

No comments:

Post a Comment