जी बाब वैज्ञानिक पद्धतीद्वारे सिद्ध होऊ शकत नाही, तिला अस्तित्वात राहण्याचा अधिकार नाही. थोडक्यात अशी बाब अस्तित्वात असू शकत नाही. हा निष्कर्ष वैज्ञानिक दृष्टीकोनाची निष्पत्ती आहे.
याचा दुसरा अर्थ , ज्ञान मिळविण्याचा वैज्ञानिक पद्धतीशिवाय इतर मार्ग नाही, असाही निघतो.
मानवी जीवनात आपल्याला आणि इतरांना असेही अनुभव आलेले असतात की , ज्यांचे वैज्ञानिक स्पष्टीकरण करता येत नाही. याचा अर्थ या प्रकारच्या अनुभवाचे कालांतराने वैज्ञानिक स्पष्टीकरण मिळणार आहे किंवा हे अनुभव म्हणजे केवळ आभास आहेत.
बरेच अनुभव वैज्ञानिक नियमाशी पूर्णपणे विरोधी असतात. मग ते वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार निश्चितपणे आभास ठरतात.
आपल्याला काय वाटते?
No comments:
Post a Comment