Monday 25 November 2013

भारतीय कार्मावादाचा सिद्धांत माणसाची कार्यप्रेरणा  नष्ट करतो. तो त्याला निराशाग्रस्त बनवितो . अशा प्रकारची सर्वसाधारण समजूत आहे. तथापि कर्मवाद समजून घेतल्यावरही आपल्याला असेच वाटते काय, हे पाहायला हवे.
कर्मवाद थोडक्यात--
१) केलेल्या प्रत्येक मानसिक, वाचिक, शारीरिक कर्माचे चांगले- वाईट फळ मिळतेच.
२) हे फळ मागच्या किंवा या जन्मात केलेल्या कर्माचे असून ते या जन्मात किंवा पुढील जन्मात  मिळू शकते.
३) चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट मिळते.
४) याचा अर्थ चांगले फळ मिळवायचे असेल तर चांगलेच कर्म करावे लागते
५) आपण सध्या दु:खात  असूत तर आपण आपल्या पूर्वी केलेल्या वाईट कर्माचे नियत फळ भोगत आहोत, असे समजावे. त्यासाठी इतरांना  दोष देण्याचे कारण नाही .
६) दु:खाच्या  परिस्थितीतही आपण चांगलेच काम करीत राहिलो तर आपल्याला या चांगल्या कामाचे फळ पुढे निश्चितपणे मिळणारच आहे. याचा अर्थ , दु:ख भोगून संपणारच आहे आणि चांगली स्थिती येणारच आहे .
७) आपण वाईट परिस्थितीत असताना वाईट वागलो तर आपली प्राप्त परिस्थितीतून विशिष्ट वेळी सुटका होइलही . परंतु आपण या परिस्थितीत असताना केलेल्या वाईट कर्माचे फळ आपणास पुढे निश्चितच मिळणार आहे.
कर्मवादाच्या वरील स्वरूपामुळे मला जगण्याचे पुढील तत्त्वज्ञान प्राप्त होऊ शकते.--
१) वाईट परिस्थितीत किंवा दु:खातही चांगले कर्म करणे मुळीच सोडू नये.
२) आपल्यावर इतर कोणामुळे दु:खी स्थिती ओढवली असली तरी सुडाची भावना न ठेवता आपण चांगलेच वागावे. कारण वाईट वागून तात्पुरते बरे वाटले तरी  पुढे दीर्घकाळाचे दु:ख ठेवलेलेच आहे.
थोडक्यात -----------
भारतीय कर्मवाद  व्यक्तीला नेहमीच चांगले कर्म करण्याची  प्रेरणा देतो.
तो व्यक्तीला कधीच निष्क्रिय किंवा निराशावादी बनवित नाही.
आपल्याला काय वाटते ? 

No comments:

Post a Comment