Sunday 8 December 2013

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या परिणामाला Modi  Factor  पेक्षाही राज्यकर्त्याची भोंगळ आणि चुकलेली आर्थिक धोरणे, निष्क्रिय आणि दिशाहीन प्रशासन, अनिर्बंध प्रमाणात वाढलेली महागाई  आणि आकाशही व्यापणारा भ्रष्टाचार हीच कारणे महत्त्वाची ठरलेली असावीत.

इतरत्रही ''आप'' सारखा सक्षम पर्याय मिळाला तर Modi Factor ची कसोटी लागेल, यात शंका नाही.

अन्नसुरक्षा कायद्यासारख्या लोकप्रिय योजना आता लोकांना फसवू शकणार नाहीत, असे वाटते. जनसामान्याच्या जीवनात मूलगामी परिवर्तन घडवू आणणारी धोरणेच आता आकर्षक ठरतील किंवा ठरावित, असे वाटते.

हिंदुत्ववाद किंवा धर्मनिरपेक्षता या बाबीही आता फार प्रभाव टाकू शकतील , असे वाटत नाही.  राजकीय पक्षाच्या  हिंदुत्ववादाचा थोडा सकारात्मक आणि अधिक नकारात्मक आणि त्यांच्या धर्मनिरपेक्षतेचा थोडा सकारात्मक आणि थोडा  नकारात्मक,परिणामी शुन्य परिणाम होईल, असे वाटते. नवीन पिढीला यात फारसा रस नाही, हे राजकीय पक्षांनी शक्य तितक्या लवकर लक्षात घेण्याची गरज आहे. 

No comments:

Post a Comment