Friday 5 July 2013

antim hetu

सर्व जगातील आणि सर्व काळामधील महापुरुष मोठेच आहेत.  अखिल मानवजातीचे कल्याण करणे हाच त्यांचा निरपेक्ष हेतू असतो.
तथापि -
वेगवेगळ्या महापुरुषांच्या समाजस्थितीविषयक  आकलनाला देश-काल-स्थितीच्या तसेच त्यांच्या बुद्धीच्याही मर्यादा असतात . तसेच मानवकल्याणाचा अर्थही प्रत्येकानुसार वेगवेगळा असणे स्वाभाविक  मानले पाहिजे.
त्यामुळेच -
त्यांनी मांडलेले विचार , तत्त्वज्ञान , त्यांचे कार्य , त्यांचे आदर्श , त्यांनी मांडलेली आचरणव्यवस्था यामध्ये काहीशी भिन्नता  आढळून येते.
त्यामुळेच -
जगात वेगवेगळे धर्म, संप्रदाय , विचारधारा आढळून येतात.
तथापि -
या महापुरुषांचा हेतू नि:संशयरित्या  मानवकल्याण हाच असतो.
म्हणूनच -
धर्म, संप्रदाय , विचारधारा यांच्या आधारांवर समाजात पडलेले परस्परविरोधी तट हे प्रयोजनशुन्य अर्थात निरर्थक आहेत.

No comments:

Post a Comment