कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज यांची आज जयंती . महाराजांची जयंती महाराष्ट्रामध्ये ''सामाजिक न्याय दिन '' म्हणून साजरी केल्या जाते.
महाराष्ट्राच्या शिल्पकारांपैकी महाराज एक महान शिल्पकार होते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराजांचे फार मोठे योगदान आहे, यात शंका नाही.
जनतेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सामान्य जनतेमध्ये शिक्षणाचा प्रसार होणे आणि प्रत्येकाला सामाजिक प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले. त्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराला विशेष महत्त्व दिले. नवीन शाळा काढणे , अशा कृतींना सक्रिय प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांसाठी वसती गृहे काढणे, आरक्षणाची तरतूद करणे या मार्गांनी त्यांनी शिक्षण प्रसाराचे काम केले.
सामाजिक समता निर्माण झाल्याशिवाय उपेक्षीतांकडून संधींचा योग्य प्रकारे वापर होऊ शकत नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी जातीयवाद, अस्पृशता या अपप्रवृत्तींविरुद्ध लढा दिला.तसेच त्यांनी सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या चळवळींना पाठींबा आणि आवश्यक वाटल्यास सक्रिय मदत केली.
महाराजांचा या निमित्ताने ''आर्य समाज'' तसेच ''सत्यशोधक समाज'' या सामाजिक संघटनांशी घनिष्ठ संबंध आला . यातूनच महाराज आर्य समाजाचे की सत्यशोधक समाजाचे यावर विद्वानांमध्ये वादही झाला किंवा होत आहे.
उघड उघड त्यांनी स्वत:ला आर्यसमाजाचे म्हणवून घेतले. परंतु स्वत:च्या कृतींनी सत्यशोधक समाजाला सक्रिय पाठींबा दिला. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, जिथे जिथे सुधारणा तिथे तिथे महाराज , हेच खरे .
महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांना अनंत अभिवादन .
महाराष्ट्राच्या शिल्पकारांपैकी महाराज एक महान शिल्पकार होते. आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत महाराजांचे फार मोठे योगदान आहे, यात शंका नाही.
जनतेच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सामान्य जनतेमध्ये शिक्षणाचा प्रसार होणे आणि प्रत्येकाला सामाजिक प्रतिष्ठा मिळणे आवश्यक आहे, हे त्यांनी ओळखले. त्यासाठी त्यांनी शिक्षण प्रसाराला विशेष महत्त्व दिले. नवीन शाळा काढणे , अशा कृतींना सक्रिय प्रोत्साहन देणे, विद्यार्थ्यांसाठी वसती गृहे काढणे, आरक्षणाची तरतूद करणे या मार्गांनी त्यांनी शिक्षण प्रसाराचे काम केले.
सामाजिक समता निर्माण झाल्याशिवाय उपेक्षीतांकडून संधींचा योग्य प्रकारे वापर होऊ शकत नाही, हे त्यांनी ओळखले होते. त्यासाठी त्यांनी जातीयवाद, अस्पृशता या अपप्रवृत्तींविरुद्ध लढा दिला.तसेच त्यांनी सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या चळवळींना पाठींबा आणि आवश्यक वाटल्यास सक्रिय मदत केली.
महाराजांचा या निमित्ताने ''आर्य समाज'' तसेच ''सत्यशोधक समाज'' या सामाजिक संघटनांशी घनिष्ठ संबंध आला . यातूनच महाराज आर्य समाजाचे की सत्यशोधक समाजाचे यावर विद्वानांमध्ये वादही झाला किंवा होत आहे.
उघड उघड त्यांनी स्वत:ला आर्यसमाजाचे म्हणवून घेतले. परंतु स्वत:च्या कृतींनी सत्यशोधक समाजाला सक्रिय पाठींबा दिला. थोडक्यात सांगावयाचे झाल्यास, जिथे जिथे सुधारणा तिथे तिथे महाराज , हेच खरे .
महाराजांच्या जयंती निमित्ताने त्यांना अनंत अभिवादन .
No comments:
Post a Comment