Wednesday, 30 April 2014

मानवी समाजातील बहुत्येक समस्या या शोषणातून निर्माण होतात. शोषणाची आवश्यकता चंगळवादाच्या आकर्षणातून निर्माण होते.
तर मग या चंगळवादाचे आव्हान  पेलायचे कसे?

Tuesday, 29 April 2014

मानवी जीवनातील अनाकलनीय बाबी,अनिश्चितता, असुरक्षितता,अज्ञान आणि शेवटी निश्चित असा मृत्यू या बाबी माणसाच्या मनात भीती निर्माण करतात. अशा परिस्थितीत माणसाचे आस्तिक (देवाचे अस्तित्व मानणे ) असणे मला स्वाभाविक वाटते.

खरे कौतुक वाटते ते चार्वाकांचे. आजच्या पेक्षाही अधिक अनिश्चित मानवी जीवनातही ते देवाच्या अस्तित्वाला नि:सन्दिग्धरित्या नाकारतात. देव मानण्यापेक्षाही  असे करणे अधिक  कठीण आहे, असे मला वाटते.

आपल्या देशात अशीही एक परंपरा असणे, हे आपल्या बहुसांस्कृतिक देशाचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे, यात शंका नाही.